स्वदेस न्यूज (प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे मुंबईहून
कोलंबियातील बुकारामांगा येथे आयोजित ५६ व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र (फिजिक्स) ऑलिम्पियाड २०२६ मध्ये भारतीय विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक कामगिरी करत ५ सुवर्णपदके पटकावली आहेत. या घवघवीत यशासह भारताने ८७ देशांमधील ३८१ स्पर्धकांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्व ५ विद्यार्थ्यांनी संयुक्तपणे प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदकाची कमाई केली आहे.
कनिष्क जैन (पुणे, महाराष्ट्र),श्रेष्ठ सुरैया (मुंबई, महाराष्ट्र),ऋद्धेश अनंत बेंडाळे (इंदूर, मध्य प्रदेश),ऋषित गर्ग (नवी दिल्ली),स्वरित जोशी (अहमदाबाद, गुजरात)अशी पदक मिळविलेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत.
जागतिक क्रमवारी सर्व सहभागी विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक जिंकल्यामुळे, भारताने जागतिक पातळीवर चीन, रशिया, कझाकस्तान, दक्षिण कोरिया आणि तैवान यांच्यासोबत संयुक्तपणे प्रथम क्रमांक पटकावला आहे. भारताने याआधी २०१८ मध्येही अशीच १०० टक्के सुवर्णपदकांची कमाई केली होती. यामुळे विज्ञान आणि विज्ञान जगतातील जागतिक स्तरावरील भारताची प्रगती अधोरेखित होत आहे.
याविषयी अणुऊर्जा विभाग सचिव आणि अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ. अजित कुमार म्हणाले की, अनेक देशामध्ये भौतिकशास्त्र अभिव्यक्तीमध्ये पाच सुवर्णपदके संयुक्तपणे पटकाविणे हे आपल्या पाल्याची प्रतिभा आणि वैज्ञानिक प्रगती याचे उदाहरण आहे. मनःपूर्वक अभिनंदन. त्यांचे हे यश अनेक युवा शक्ति विज्ञान राज्यासाठी उत्कृष्ठ प्रेरणा असून ते नवन्मेष भारताचे नेतृत्व अधिक प्रभावीपणे करेल.
या अद्भूत कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय चमूचे विशेष अभिनंदन केले.





