स्वदेस न्यूज(प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी नवी दिल्लीहून
श्रीनाथ भंडारी आणि रमेश थामी यांनी ‘ग्रीनसोल’ नावाच्या स्टार्टअप द्वारे टाकून दिलेल्या जुन्या जुताऱ्यांपासून चपला बनवून त्या गरजू व गरीब मुलांना वाटण्याचा सामाजिक उपक्रम सुरू केला आहे. हा मुंबई स्थित स्टार्टअप जुने कपडे व साहित्यापासून शालेय बॅगा व मॅट देखील तयार करतो.
यात फेकून दिलेले किंवा वापरून जुने झालेले शूज गोळा करून त्यावर प्रक्रिया केली जाते आणि त्यापासून दर्जेदार चपला बनवल्या जातात.तयार झालेल्या या चपला आणि जुन्या कपड्यांपासून बनवलेल्या शालेय बॅगा ग्रामीण भागातील व गरीब विद्यार्थ्यांना मोफत वाटल्या जातात. यामुळे लाखो जुने शूज कचरा म्हणून कचराकुंडीत किंवा लँडफिलमध्ये जाण्यापासून वाचतात. तसेच गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना अनवाणी चालावे लागत नाही. पर्यावरणपूरक पद्धतीने पुनर्वापर केल्यामुळे कार्बन उत्सर्जन कमी होते. सीएसआर पार्टनरशिपच्या माध्यमातून हा उपक्रम देशभरात विस्तारला आहे.
श्रीनाथ भंडारी आणि रमेश थामी हे मुंबईचे रहिवासी आहेत. श्रीनाथ भंडारी आणि रमेश थामी दोघेही आजी-माजी मॅरेथॉन धावपटू आहेत. २०१३-२०१५ दरम्यान मुंबईत त्यांनी या स्टार्टअपची सुरुवात झाली. आज त्यांनी उभारलेल्या स्टार्टअपची वार्षिक उलाढाल सुमारे ३ कोटी रुपये आहे. या उपक्रमाची सुरुवात एका झोपडपट्टीतील छोट्या युनिटमधून झाली. पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक कल्याण यांचा सुंदर संगम या उपक्रमातून साधला गेला आहे.
सुरुवातीचा प्रवास अत्यंत आव्हानात्मक होता. दोघांचाही पादत्राणे उत्पादन उद्योगाशी कोणताही संबंध नव्हता. त्यांनी मुंबईतील एका झोपडपट्टीत भाड्याने घेतलेल्या छोट्याशा युनिटमधून काम सुरू केले. सुरुवातीला ते दिवसाला केवळ १५ ते २० जोड बूट तयार करू शकत होते. मात्र, राम फॅशन एक्सपोर्ट्ससोबत झालेली भागीदारी त्यांच्या व्यवसायासाठी महत्त्वाचा टप्पा ठरली. त्यांनी अशी तंत्रज्ञान पद्धत विकसित केली, ज्यामध्ये जुन्या बुटांचे तुकडे करून त्यांना प्रमाणित आकार दिला जातो आणि त्यामध्ये २० टक्के नवीन साहित्य (मटेरियल) मिसळून स्वच्छ, टिकाऊ आणि आरामदायी चप्पल तयार केली जाते.
आज श्रीनाथ आणि रमेश यांचा स्टार्टअप दरमहा १५,००० ते २०,००० जोड जुने बूट गोळा करतो. हे बूट पूर्णपणे वेगळे करून त्यांचे विविध भाग स्वतंत्र केले जातात. त्यानंतर मुलांच्या पायांच्या आकारानुसार डाय-कटिंग केली जाते. त्यांची ग्राउंड टीम गावांमध्ये आणि आदिवासी भागांमध्ये जाऊन मुलांच्या पायांचे मोजमाप घेते, जेणेकरून त्यांना योग्य आकाराच्या चप्पला मिळू शकतील. १०० हून अधिक कॉर्पोरेट कंपन्यांच्या सीएसआर सहकार्यामुळे हे जाळे आता भारतातील २० राज्यांपर्यंत विस्तारले आहे. या स्टार्टअपचा स्वतःचा रिटेल ब्रँडही आहे, जो पर्यावरणपूरक स्नीकर्स आणि इतर अॅक्सेसरीजची विक्री करतो. या व्यवसायातून कंपनी दरवर्षी सुमारे २.५ ते ३ कोटी रुपयांची उलाढाल करत आहे. या मॉडेलमुळे केवळ कचरा कमी होत नाही, तर रोजगाराच्या नव्या संधीही निर्माण होत आहेत.
भविष्यात श्रीनाथ आणि रमेश यांचा हा उपक्रम नेपाळ, भूतान आणि आफ्रिकेतील काही देशांमध्ये विस्तारण्याचा मानस आहे. तसेच, बुटांच्या कचऱ्याचा वापर सार्वजनिक पायाभूत सुविधा—उदा. रनिंग ट्रॅक—बांधण्यासाठी सरकारच्या सहकार्याने करण्याचीही त्यांची योजना आहे.






Great
Bhaari idea 💡